Tuesday, June 2, 2009

बोलने कमी लिहिने जास्त..

आजकाल बोलान्यासाठी तोंड उघडावे लागत नाही तर हात चालवावे लागतात..नवीन जमान्याचे नवीन नियम!! कित्येकदा मनात विचार येतो बोलण्याचा आणि लिहिण्याचा किती जवालचा संबंध आहे? कदाचित तेवधाच जेवाढा रोज सकाळी पेपर मधे येनारया बात्म्यात आणि टीवी मधे दाखवाल्या जानारया न्यूज़ मधे आहे.बातम्या काय अथवा भावना काय पोहच्वाय्चे माध्यम वेगले.लेखनी आणि जिव्हनी यांचा न संपनारा खेल.जिथे आज न्यूज़ द्वारे पेपर पेक्षा लवकर बातमी पोहचावाता येते तिथेच messenger वर भरभर टाइप करून मनातली गोष्ट बोलून टाकता येते .म्हानुनाच लेखनी आणि जिव्हनी यांची शर्यत पूर्वापर चालत आली आहे.पण मग messenger वर व्यक्त केलेल्या भावना कितपत योग्य आणि ग्राह्य मानायाच्या? ह्म्म.. हा शब्द तर प्रत्येक दुसरया वाक्यात असतो.बोलिभाशेत बोलताना त्याने एवढी धन्यता नसेल मानली तेवढे महत्वा त्याला messenger ने दिले.माणूस हा असा प्राणी आहे ज्याला कमी अधिक प्रमाणात बोलायला आवडते.. आणि जेवा नवीन आयुष्याच्या नियमावालित मित्रा फक्त messenger च्या लिस्ट मधेच दिसतात, तेवा मग गड्या हो सुरु..तोंड बंद आणि हात सुरु..काय बोलतो,काय पुसतो,ह्म्म लिहितो, विचार करतो,समोर्च्यावर छाप सोडायाचा प्रयत्न करतो.त्या लिस्ट वरचे मित्रा कमी अधिक प्रमाणात तेच असतात. रोज त्यांच्याशी बोलताना मग अजुन काय? बोला साहेब असे प्रश्नोत्तर.. काही अर्थ नसतो तरी पण विचार्पुस केल्याचे समाधान असते.म्हणालो ना माणसाला बोलायला लागते. नवीन जमान्याचे नवीन नियम!!कधी असाच स्वताहाशी विचार करतो तेवा मग समजते मी आजकाल बोलतो कमी आणि लिहितो जास्त..भावना अशा सहजतेने व्यक्त करतो की समोराच्याशी बोलताना जास्त सोयीस्कर होते.जसे आधी प्रेम पत्रातुन व्यक्त व्हायचे तसे भावना विचार सगळे एका मागुन एक सांगून chat वर लिहून मोकले. भिती फक्त एवाधिच वाटते की याने आपण उद्या मूक बधिर वायला नको.. मित्राची कालजी वाटते पण मग ती फक्त सवयीने take care असे लिहिन्यापुरती मर्यादित रहयाला नको..एवढी सवय या गोष्टींची नको व्ह्यायाला की ह्या भावना रुक्ष होउन जातील.म्हनुनाच..chatting प्रकार आहे छान पण त्याने भावना, विचार यांचा आदान प्रदान बोल्न्यातुन नजरेतुन जो ओलावा व्यक्त होतो हरपून जाऊ नए..!!!